अपर्णा वाईकर विवेकानंद मंचातर्फे आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला आलेल्या लोकांनी संगम सभागृह तुडुंब भरले होते. सर्व उपस्थितांचे स्वागत करून झाल्यावर निवेदक म्हणाले, “ आणि आता मी श्री.संतोष राठी व सौ. बापटताई ह्यांना मंचावर आमंत्रित करतो. आपण राठीसाहेबांना श्री सुपर मार्केटचे मालक म्हणून ओळखतो , पण आज मी त्यांची एक वेगळीच ओळख करून देणार आहे. गेल्या महिन्यात पुण्यात आलेल्या पुराच्यावेळी ह्यांनी एका महिलेला आणि छोट्या मुलीला पाण्यात वाहून जाणाऱ्या गाडीतून वाचवले. ज्यांचा जीव संतोषदादांनी वाचवला त्या म्हणजे बापटताई! त्या प्रसंगाबद्दल बोलण्यासाठी मी बापटताईंना बोलवतो. ” “ नमस्कार माझं नाव संध्या बापट . २५ सप्टेंबर हा दिवस मी कधीही विसरणार नाही. जीवन आणि मरण ह्यात किती कमी अंतर असतं हे मला त्या दिवशी कळलं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि ती वेळ आली नाही त्याला कारण संतोषदादा! मला तो दिवस काल घडल्यासारखा आठवतो. मी आणि माझी छोटी मुलगी गाडीतून घरी निघालो होतो. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि मला माझी गाडी कंट्रोल करणं अवघड झालं होतं. त्या लोंढयाबरोबर माझी गाडी वाहून रस्...
Neil is showing his creativity through pictures. Great work Neil.
ReplyDelete